सावधान...वादळी पाऊसासह,मुसळधार पाऊसाची शक्यता ; शेतकरी टेंशनमध्ये
सोमेश्वरनगर - भारतीय हवामान खात्याकडून पुन्हा एकदा ३ दिवस अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह पडणार असा अंदाज वर्तवला असल्याने तरकरी शेतकरी वर्ग मध्ये टेन्शन वाढले आहे
देशात अनेक राज्यामधील हवामानात बदल होत आहे. सध्या अनके राज्यामध्ये पाऊस कोसळत आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात दाट डघाळ वातावरण बुधवार दि १५ रोजी दुपारपासून तयार झाले असून संध्याकाळच्या समयी गार वारा वाहत असल्याने जोराचा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतातली उभी गहू, मका सह तरकरी पिकांची नसून होईल काय या टेंशनमध्ये शेतकरी वर्ग दिसत आहे... नुकताच हवामान खात्यानी आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तापमानात बदल होत हवामान देखील बदलत आहे. काही ठिकाणी उष्णतेत वाढ झाली आहे तर काही ठिकाणी उष्णतेत मोठी घट झाली आहे. तसेच हवामान खात्याकडून उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज देखील वर्तवला आहे.
■■■■■■■■■■■■■■■■
सध्या बारामती च्या पश्चिम भागात गहू काढणीला सुरुवात झाली आहे,मुसळधार पाऊस झाला तर उभे पीक सोडून द्यावे लागेल व मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेलं.
शेतकरी अनिल गायकवाड, करंजेपुल