Type Here to Get Search Results !

मागण्या मान्य न झाल्यास राज्य संघटनेने नमुद केल्याप्रमाणे दि १६ ऑगस्ट पासून काम बंदचा ईशारा

मागण्या मान्य न झाल्यास राज्य संघटनेने  नमुद केल्याप्रमाणे  दि १६ ऑगस्ट पासून काम बंदचा ईशारा

मोरगाव प्रतिनिधी 

राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीसह , वारसदारांना अनुकंप तत्वावर भरती यासंह विविध मागण्यांसाठी कोतवालांच्या  राज्य संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे .  मागण्या मान्य न झाल्यास राज्य संघटनेने  नमुद केल्याप्रमाणे  दि   १६ ऑगस्ट  पासून    काम बंद आंदोलनाचा ईशारा दिला आहे .  मागण्या मान्य न  झाल्यास  या आंदोलनात बारामती तालुका कोतवाल संघटनाही  सहभागी होणार आहे . याबबातचे  निवेदन  निवासी नायब तहसीलदार धनंजय जाधव यांना

तालुका संघटनेच्या वतीने दिले आहे .


राज्यातील ग्रामीण भागात महसूल खाते व जनता यामध्ये कोतवाल एक दुवा समजला जातो .  देशाच्या स्वातंत्र्यानंतरही चतुर्थ श्रेणीबाबत त्यांच्या समस्या जैसे थे आहेत . यामुळे कोतवालांच्या राज्य संघटनेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विविध मागण्यांसाठी निवेदन दिले आहे . यामध्ये १५ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे . मागण्या  मान्य न १६ ऑगस्टपासून  राज्यव्यापी काम बंद आंदोलन होणार आहे . या  कामबंद  आंदोलनात  बारामती तालुका कोतवाल संघटनाही सामील होणार आहे . याबाबतचे निवेदन  काल नायब तहसिलदार  धनंजय जाधव  यांना दिले  .यावेळी तालुका अध्यक्ष संतोष खोमणे, सचिव शेखर खंडाळे, शैलेश नेवसे , विजय स्वामी  सचिन निकम ,राहुल पोमनें, अंकुश खोमणे यासह सर्व कोतवाल बांधव उपस्थित होते. 


राज्यातील कोतवालांना  चतुर्थ  श्रेणी मिळावी , कोरोना काळात  कर्तव्य बजावत असताना अनेक कोतवालांना आपले प्राण गमवावे लागले असल्याने त्यांच्या वारसदारांना अनुकंप तत्त्वावर कामावर घ्यावे .सेवानिवृत्ती नंतर कोतवालांना  कुठलाही लाभ मिळत नसल्याने एकरकमी दहा लाख एपये मिळावेत  , शासनाने कोतवालां संदर्भात ६ फेब्रुवारी २०१९ रोजी  काढलेले मार्गदर्शक पत्र रद्द करण्यात यावे . कोतवालाना तलाठी तत्सम पदामध्ये पन्नासटक्के आरक्षण द्यावे  आदी मागण्या राज्य संघटनेच्यावतीने शासनाकडे केल्या असल्याचे तालुकाध्यक्ष संतोष खोमणे यांनी सांगितले 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test