Type Here to Get Search Results !

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखा; हलगर्जीपणा करु नका-उपमुख्यमंत्रीअजित पवार

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखा; हलगर्जीपणा करु नका-उपमुख्यमंत्रीअजित पवार 

  
    बारामती -  बारामती शहरासह तालुक्यात मागील आठवडयापेक्षा कोरोना बाधीतांचा चढता आलेख दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. तसेच कोणीही हलगर्जीपणा करु नये, अशा  सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच बारामती तालुक्यात सुरु असणारी विकास कामे दर्जेदार करण्याबरोबरच सर्व विभागांनी समन्वय राखत विकासकामे वेळेत पूर्ण  करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

         बारामती परिसरातील विकासकामांच्या पहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे,  एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव,  उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे,  उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर,  गटविकास अधिकारी राहूल काळभोर,  सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता ढेपे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता राहूल पवार,  पाटबंधारे विभागाचे  कार्यकारी अभियंता  धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे,  शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव आदी मान्यवरांसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.


बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना, संसर्गाची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, अँटिजेन तपासणी, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सीजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
   
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बारामती शहरासह तालुक्यात मागील आठवडयापेक्षा कोरोना बाधींतांचा चढता आलेख दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. तसेच कोणीही हलगर्जीपणा करु नये. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन बारामती शहरात तसेच ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे. ग्रामिण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव जादा आहे. संसर्ग कशामुळे वाढला याची माहिती जाणून घेऊन त्यावर उपाययोजना राबवा. टेस्टींग व सर्वेक्षणावर भर देणे आवश्यक आहे. हॉटस्पॉट ठिकाणे प्रतिबंधीत करण्यात यावीत, जेणे करुन कोरोना संसर्गाची साखळी तोडणे शक्य होईल. कोरोना संसर्ग इतर ठिकाणी कमी होत आहे. बारामतीमध्ये का कमी होत नाही त्याची कारणे शोधा व त्यावर उपाययोजना राबवा असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची  दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test