पुरंदर तालुका प्रतिनिधी - सिकंदर नदाफ
जेजुरी येथील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले जय मल्हार फाऊंडेशन यांच्या वतीने कडेपठार पायथ्याला असलेल्या डोंगर दरीत वन्य पशु पक्षी यांना पाण्याची व धान्य ची व्यवस्था करण्यात आली,सलग सातव्या वर्षी हा उपक्रम राबविला जात आहे, जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या हस्ते येथील पाणवठ्यात पाणी सोडुन व धान्य ठेऊन या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, या डोंगर भागात वनविभागाने जवळपास सात ते आठ ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत त्या सर्व पाणवठ्या जवळ पशु पक्षी यांना धान्य देखील ठेवण्यात आले यावेळी जेजुरी शहर वनविभागाचे वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, जयश्री पवार,वनसेवक गजानन बयास मनोज मोहिते, विशाल बारभाई, सचिन पेशवे, अभिजित बारभाई, रज्जाक तांबोळी, संदिप घोरपडे,गोरख कुंभार, धनंजय नाकाडे आदी उपस्थित होते यावेळी दानशुर व्यक्तींनी पशु पक्षांना पाणी आणि धान्य द्यावे असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल बारभाई यांनी केले.